Friday 18 November 2011

आपलं ते.....

"मेहता प्रकाशन???? अगं ते फक्त भाषांतर केलेली पुस्तके प्रकाशित करतात......त्यापेक्षा आपली original मराठी पुस्तकं वाच....." इति माझे काका........
हे वाक्य त्यांनी उच्चाराव यावर माझा १ सेकंद विश्वास च बसेना.......
ज्या माणसाला साहित्यात इतका interest कि त्याच्या घरात १ अख्खी भिंत फक्त पुस्तकं ठेवलेली आहेत त्यांनी असं म्हणावं हे मला पटलच नाही.......

तसं बघायला गेलं तर इतर भाषांमध्येही तितकंच किंबहुना जास्तचं चांगलं लेखन केलेलं आढळतं.
 पण दुसऱ्याची कदर करू नये......'आपलं ते बाब्या दुसऱ्याच ते कार्ट' या चालीवर आपण कायम मराठी सोडून इतरांना तुच्छ लेखात आलोय.......

याचा अर्थ असं नाही कि माझं मराठी वर प्रेम नाही किंवा इतरांबद्दल मला जास्त पुळका आहे......
पण एकीकडे Globalization झालं म्हणायचं आणि दुसरीकडे असं वागायचं हे मला नाही पटतं..........

आपल्या मराठीत पु.ल.,व.पु. जितका सुंदर लिहितात तितकंच अप्रतिम झुंपा लाहिरी लिहितात.....
रत्नाकर  मतकरी त्यांच्या गूढ कथांमधून जसं खिळवून ठेवतात तशीच जादू अगाथाख्रिस्ती सुद्धा करतातच की.......

एवढंच काय शोभा डे स्वतः मराठी भाषिक असून सर्व लिखाण इंग्रजी मध्ये करतात........
याचा अर्थ त्या मराठी द्वेष्ट्या आहेत असं होत नाही.......


उलट इतर भाषेतील लेखन वाचल्याने विचारांची कशा रुंदावते असा माझा समज आहे.........
त्यामुळे  सर्व प्रकारच्या लेखनाची गोडी लागते किंवा लागलीये असं म्हणायला हरकत नाही..........

Friday 4 November 2011

उगाच......कशात काही नसताना........

आज खूप बोलावसं वाटतंय तुझ्याशी.....
तुला वाटेल चला आज मी सांगणार काहीतरी......काहीतरी खास.....माझ्या मनातलं.....
अर्थात ते बरोबर च आहे.......कारण तू म्हणतोस तस मी कधीच व्यक्त होतं नाही.....स्वताहून.........
कोणतीही गोष्ट सांगत नाही.......खास तुझ्या शैलीत सांगायचं झालचं तर "हातचं राखून सांगते".....

पण मला आज काहीतरी वेगळ सांगायचंय तुला......तुझ्याजवळ सगळं सांगितलं कि खूप मोकळं वाटतं म्हणून च सांगतीये.....

इतक्या वर्षात माझ पुस्तकावेड यावर कधीच बोललो नाही आपण............फक्त मला पुस्तकं वाचायला आवडतात एवढचं तुला माहितीये......
पण त्यातही गूढकथा वाचायला जास्त आवडतात हे तुला मी  कधीच नाही सांगितलं......
गूढकथा वाचताना कसं मनाला एक वेगळं रूप चढत........आणि म्हणूनच अधाश्यासारखी वाचते मी त्या......
वाचता वाचता मनातल्या मनात त्यातल्या प्रत्येक गोष्टीशी माझी real life जुळवू पाहते.......
कित्येक गोष्टीत नवऱ्याने बायको ला वेड केलेलं.................दुसऱ्या बाईच्या नादाने तिला mentally unstable ठरवलेलं.......असा बरचसं काहीबाही......

या सगळ्या गोष्टींचा इतका पगडा मनावर आहे की कधी कधी वाटतं आपल्याबरोबर सुद्धा असा काही घडणार नाही ना???
कशावरून ह्यातली एखादी घटना माझ्या आयुष्यात नाही घडणार???
खरतर तू इतका प्रेम करतोस माझ्यावर,आज पर्यंत इतका दिलंयस मला भरभरून.......
आणि आता त्या प्रेमावर शंका घेणं बरोबर नाही हे मान्य..........
पण वाचलेल्या अनेक घटनांची भूत माझ्या मानगुटीवर बसतात..........कधी कधी चक्क पाठलाग करतात माझा........

आता भूत हा शब्द ऐकून च हसत सुटशील हे माहितीये मला....
म्हणशील तू एवढी शूर कि भूतांना पळवून लावशील,आणि तूच त्यांना घाबरतेस.....हे शक्य नाही.............
पण खरं सांगायचं तर कधी कधी अंधारात किंवा सावलीत सुद्धा त्या कथांमधली माणसं दिसायला लागतात........
कधी एकट बसलं कि स्वतःचे श्वास गरम झाल्याचे जाणवू लागतात......

मला माहितीये तू हे वाचलसं तर हसण्यावारी नेशील......म्हणशील खूप विचार करतेस ना म्हणून असं होतं......
स्वताःच्या दुखऱ्या डोक्याला त्रास करून घ्यायची सवय च आहे तुला असं म्हणशील.......
पण कधी कधी वाटत की खरंच सर्दीचा काय संबंध....विचार  करून च डोकं दुखत असेल माझं......
                                                                                                                                                                  
खरं तसं बघायला गेलं तर काहीच संबंध नाही माझा कोणत्याच कथेशी वा त्यांच्या लेखकांशी........
तरी सुद्धा त्या गोष्टी छळतात मला.............का???काय माहित??

आत्ता एवढं बोलूनसुद्धा मनातली जळमटं साफ नाहीच झालेली.......तरीपण बरं वाटेल म्हणून केलेला हा प्रयत्न............
उगाच......कशात काही नसताना........

Monday 26 September 2011

तिढा

खूप चीडचीड होतीये..........काय चूक झाली माझी????प्रत्येक वेळेस का असं व्हावं??????
काय  केलं की आयुष्य सरळमार्गी जगता येईल??
मला  वाटलं आणि गेले मी पिक्चर बघायला..........
काय चुकलं यात?
एवढंच कि त्याला न विचारता माझ्या खूप जवळच्या मित्रा बरोबर गेले........
पण  तो इथे असता तर हा प्रश्न च नसता आला..........कारण जेव्हा तो इथे असतो तेव्हा मी फक्त त्याची असते.......फक्त त्याच्या बरोबर असते.....
पण या असण्याचा सुद्धा त्याने वेगळा अर्थ घेतला......
त्याच  असं म्हणणं पडलं कि तो असताना मी फक्त त्याला भेटते आणि इतरवेळा त्याच्या पाठीमागे इतर लोकांना भेटते ही एक प्रकारची फसवणूकच आहे...........

माझा होणारा नवरा असला तरी त्याने मला एवढं सुद्धा समजून घेऊ नये?
मी  एकविसाव्या शतकात वाढलेली एक मुलगी आहे.......मला पण मित्र आहेत.....किंबहुना मित्र च जास्त आहेत.....कारण माझ खूप चांगलं पटत त्यांच्याशी......
पण  मी कोणाबरोबरही, कोणत्याही मित्राबरोबर बोलू नये असं त्याला वाटतं..........
का मला मित्र च असू नयेत?
खरंतर  गेले ४ वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो.......अगदी आतून-बाहेरून .....
आम्हाला एकमेकांबरोबर राह्यला आवडतं.........आम्ही अख्ख आयुष्य एकत्र काढायचं ठरवलंय........

पण  या  सगळ्याचा मला त्रास होतो......कितीही पटवून घ्यायचं म्हणलं तरी त्रास हा होतोच........
मी  त्याच्या मनाविरुद्ध वागले तर त्याला त्रास होतो.....आणि मग भांडण होतात........

आणि त्याच्या मनासारख वागलं तर माझा श्वास घुसमटतो......

दरवेळी तीच आश्वासन देणं........कोणाशी न बोलण्याची शपथ घेणं........आणि मग काय पुढे?
थोड्या दिवसांनी त्याने स्वतःहून मला बोलायला भाग पाडणं.......
आणि मग परत  रे माझ्या मागल्या...........

कधीच कळत नाही कसा सोडवू हा तिढा????













Tuesday 20 September 2011

पाऊस- मला भावलेला



ऑफिस सुटून घरी यायला निघालेले...............
नुकताच पाऊस पडून गेलेला..........आकाश हलकं हलकं झालेलं..............
'आसमानी रंग है,आसमानी आंखो का' या गाण्यातल्या ओळी आठवू लागल्या..............
इतका सुरेख निळा रंग आणि तेवढ्याच सुरेख संधी प्रकाशाच्या छटा...........

पाऊस येणार म्हटलं कि मनाला हुरहूर लागते......चातकासारखी त्याची वाट पहिली जाते.......
त्याची सगळी रूपं आठवू लागतात.............
त्याचं रिमझिम बरसणं तरी कधी धांदल उडवणं...................
कधी उधाणता तर कधी निमूटपणे कोसळणं.............
कधी अल्लड मुलासारखं चिंब भिजवणं तर कधी अलगद येऊन मिठीत घेणं...........

आणि पावसाबरोबर आपोआप येतात त्या आठवणी...............
आठवू लागतात ती माणसं...............
काही खूप जवळची तर काही लांब असून सुद्धा मनाच्या जवळ असणारी.............

आठवू लागतात ते क्षण..................
पावसातली long ride आणि वाफाळत्या चहा बरोबरच्या हळव्या गप्पा...............

खिडकीतून पाऊस बघताना आठवतात ते बासरीचे सूर....................
आठवते ती सलील-संदीप यांची 'पाऊस असा रुणझुणला.......' ही कविता.................
आणि हवेतल्या गारव्यात मिळून गेलेला मारवा...........


श्रीगणेशा

आज पर्यंत अनेक blogs वाचले......पण मी कधी लिहेन असं वाटलचं नाही.......
मग विचार केला कि काय हरकत आहे लिहायला.......आज पर्यंत कागदावर इतक्या गोष्टी लिहिल्या....
म्हणून चं मग केला श्रीगणेशा......
regular लिहेन असं काहीच नाही......
पण लिहेन हे नक्की.......