ऑफिस सुटून घरी यायला निघालेले...............
नुकताच पाऊस पडून गेलेला..........आकाश हलकं हलकं झालेलं..............
'आसमानी रंग है,आसमानी आंखो का' या गाण्यातल्या ओळी आठवू लागल्या..............
इतका सुरेख निळा रंग आणि तेवढ्याच सुरेख संधी प्रकाशाच्या छटा...........
पाऊस येणार म्हटलं कि मनाला हुरहूर लागते......चातकासारखी त्याची वाट पहिली जाते.......
त्याची सगळी रूपं आठवू लागतात.............
त्याचं रिमझिम बरसणं तरी कधी धांदल उडवणं...................
कधी उधाणता तर कधी निमूटपणे कोसळणं.............
कधी अल्लड मुलासारखं चिंब भिजवणं तर कधी अलगद येऊन मिठीत घेणं...........
आणि पावसाबरोबर आपोआप येतात त्या आठवणी...............
आठवू लागतात ती माणसं...............
काही खूप जवळची तर काही लांब असून सुद्धा मनाच्या जवळ असणारी.............
आठवू लागतात ते क्षण..................
पावसातली long ride आणि वाफाळत्या चहा बरोबरच्या हळव्या गप्पा...............
खिडकीतून पाऊस बघताना आठवतात ते बासरीचे सूर....................
आठवते ती सलील-संदीप यांची 'पाऊस असा रुणझुणला.......' ही कविता.................
आणि हवेतल्या गारव्यात मिळून गेलेला मारवा...........
No comments:
Post a Comment