Are You Okay??? - इति बाबा.
हम्म.............तंद्रीतच त्यांच्या कडे बघून उत्तर दिलं मी.......
माझ्या मनात काय घालमेल चाललीये हे न कळून ते तसेच शेजारी बसून राहिले........
आणि अचानक मी त्यांना म्हणलं "मला पळून जावसं वाटतंय......I must call off the wedding".....
हे ऐकून च त्यांना घाम फुटला...........
सगळं नीट सुरळीत चालू असताना मी असं म्हणावं याचा त्यांना जबरदस्त धक्का बसला.......
आणि एका सुसंस्कृत घरात असं काही घडलं तर पुढे काय याचा विचार त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा नसेल केला......
आता मी पुढे अजून काय बोलणार याच नजरेने त्यांनी माझ्या कडे पाहिलं.
पण मी काहीच न बोलता तशीच बसून होते......
खरंतर सगळं सुरळीत च चालू होतं.....
प्रेमविवाह करत होते मी.....मी पसंत केलेला मनासारखा जोडीदार......
चार वर्षाच्या Strong Relationship मधून लग्नाकडे पाउल टाकलेलं........
घरून विरोध नव्हता......
होणाऱ्या सासरी सुद्धा माझं कौतुक होत होतं..............
काहीच कमी नव्हतं......कशाचीच ददात नव्हती......
पण मग तरीसुद्धा असे विचार का यावेत माझ्या मनात???
मनात एक प्रकारची चलबिचल सुरु झालेली .......
कि खरंच सगळं सुरळीत चालू असतानाच काहीतरी विपरीत घडण्याची शक्यता असते????
का यालाच म्हणतात "Pre-Wedding Jitters"????
love relationship चा सगळा charm गेल्यावर लग्न करतेय असंच वाटायला लागलं......
पाऊस ओसरल्यावर रस्ते कसे कोरडे होऊ लागतात ना तसं मन कोरडं व्हायला लागल्याची भावना आली.......
मग ज्यात आपल्याला interest नाही त्यात दुसऱ्याच पण आयुष्य वाया घालवायाचं ? का एक अभद्र विचार म्हणून सोडून द्यायचा ? याचा विचार करायला लागले......
कधी कधी मनात नुसती विचारांची गर्दी होते पण हवे ते प्रश्न काही केल्या सुटत नाहीत....
खरच नाही कळत मला काय करावं...