Monday 26 September 2011

तिढा

खूप चीडचीड होतीये..........काय चूक झाली माझी????प्रत्येक वेळेस का असं व्हावं??????
काय  केलं की आयुष्य सरळमार्गी जगता येईल??
मला  वाटलं आणि गेले मी पिक्चर बघायला..........
काय चुकलं यात?
एवढंच कि त्याला न विचारता माझ्या खूप जवळच्या मित्रा बरोबर गेले........
पण  तो इथे असता तर हा प्रश्न च नसता आला..........कारण जेव्हा तो इथे असतो तेव्हा मी फक्त त्याची असते.......फक्त त्याच्या बरोबर असते.....
पण या असण्याचा सुद्धा त्याने वेगळा अर्थ घेतला......
त्याच  असं म्हणणं पडलं कि तो असताना मी फक्त त्याला भेटते आणि इतरवेळा त्याच्या पाठीमागे इतर लोकांना भेटते ही एक प्रकारची फसवणूकच आहे...........

माझा होणारा नवरा असला तरी त्याने मला एवढं सुद्धा समजून घेऊ नये?
मी  एकविसाव्या शतकात वाढलेली एक मुलगी आहे.......मला पण मित्र आहेत.....किंबहुना मित्र च जास्त आहेत.....कारण माझ खूप चांगलं पटत त्यांच्याशी......
पण  मी कोणाबरोबरही, कोणत्याही मित्राबरोबर बोलू नये असं त्याला वाटतं..........
का मला मित्र च असू नयेत?
खरंतर  गेले ४ वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो.......अगदी आतून-बाहेरून .....
आम्हाला एकमेकांबरोबर राह्यला आवडतं.........आम्ही अख्ख आयुष्य एकत्र काढायचं ठरवलंय........

पण  या  सगळ्याचा मला त्रास होतो......कितीही पटवून घ्यायचं म्हणलं तरी त्रास हा होतोच........
मी  त्याच्या मनाविरुद्ध वागले तर त्याला त्रास होतो.....आणि मग भांडण होतात........

आणि त्याच्या मनासारख वागलं तर माझा श्वास घुसमटतो......

दरवेळी तीच आश्वासन देणं........कोणाशी न बोलण्याची शपथ घेणं........आणि मग काय पुढे?
थोड्या दिवसांनी त्याने स्वतःहून मला बोलायला भाग पाडणं.......
आणि मग परत  रे माझ्या मागल्या...........

कधीच कळत नाही कसा सोडवू हा तिढा????













No comments:

Post a Comment