Monday 15 October 2012

'तो' आणि 'ती'


एक ती...
स्वतःवर प्रेम करणारी..स्वतःच्या सुंदरतेचा हेवा असणारी
स्वतःच्या बुद्धिमत्तेची चांगली जाण असणारी
या जगात तीच सर्वात जास्त प्रेम स्वतःवर होतं.....जितकं प्रेम स्वतःवर ती करायची तितकंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम इतरांनी केलं असेल तिच्यावर
अनेक जण तिच्या आयुष्यात आले....काहींनी तिच्या गुणांवर स्तुतीकवन केली तर काही तिच्या रुपावर भाळले...
पण त्यातल्या एकाचाही प्रभाव तिच्यावर पडत नव्हता....
स्वतःच्या चांगल्या गोष्टींचा माज नव्हता खरंतर तिला..पण हळू हळू एक गुर्मी येत गेली तिच्या स्वभावात....
तिच्या तोडीस तोड कोणी मिळेल असा कधी वाटलं नव्हता तिला आणि म्हणून च स्वतःचं अस्तित्व तिला अजून प्यार वाटू लागलं...
येणाया प्रत्येक proposal मधले काही न काही दोष काढून ती प्रत्येकाला नाकारत होती...गर्वाबरोबर स्वतःच वय ही वाढतंय याकडे दुर्लक्ष होतं होत तिचं...
जसं तिला बनवलं तसं देवाने नक्कीच कोणाला तरी बनवलं असणार पण माणूस कितीही चांगला असला तरी देवासमोर तुच्छ चं हे ती अहंकारात विसरून गेली... 


एक तो...
राजबिंडा नसला तरी देखणा नक्कीच होता तो....
इतर पुरुषांना मत्सर वाटावा आणि स्त्रियांना लोभ असं त्याचं रूप होतं...
जोडीला श्रीमंतीही लाभली होती...व्यक्तीमत्वात कसलीच कमरतता नव्हती...
चारचौघात आपलं वेगळेपण सिद्ध करायची सवय कदाचित यातूनच लागली असावी त्याला....
कायम हुशारी च्या जोरावर सर्वांची मन जिंकत असे तो...
हातात पैसा खुळखुळत असला तरी वाईट सवयींच्या आहारी तो कधीच नव्हता गेला...
मात्र आपल्याला शोभेल अशी परिपूर्ण जोडीदार लाभेल असा त्याला कदाचित वाटत नव्हतं..
आलेल्या प्रत्येक मुलीला पारखून तिची परीक्षा करून नाही म्हणण्यातच त्याचे दिवस जात होते..

आणि एक दिवस त्या दोघांची भेट झाली..कोणी ओळखीच्या आत्याकडून त्यांना एकमेकांचं स्थळ आलेलं...
नाही म्हणायला एकही दोष नाही म्हणून लग्न लावून दिलं घरच्यांनी..
पण लग्न झालं म्हणजे जीवनाची इतिकर्तव्यता संपली असं होत नसतं...उलट इथंच तर सगळं सुरु होतं...
पहिल्याच भेटीत नजरा नजर होताच click व्हायला हव होतं खरंतर...पण इथेच काहीतरी miss झालं...
लग्न म्हणजे दोन जीवांच,दोन आत्म्यांच मिलन खरंतर पण स्वतःत गुरफटलेली ही दोघे कधीच एकमेकांना तेव्हढ समजून नाही घेऊ शकली..
स्वतःतून बाहेर आलं तर माणूस इतरांना समजून घेऊ शकतो ना...
कदाचित त्यांच्या जोडीदाराच्या अपेक्षा या त्यांच्यासारख्याच असामान्य असाव्यात..त्यामुळे ते एकमेकांच्या जवळ येऊ शकले पण नवरा-बायको म्हणून नाही....
जगासाठी नवरा-बायको असणं आणि मनाने नवरा-बायको मानणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे हे त्यांनाही हळू हळू जाणवू लागलं...
त्यांनी आपलं लग्न टिकावं म्हणून प्रयत्नही केले पण तरी ते व्यर्थच ठरले...
आणि मग शेवटी त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला..
अर्थात हे सगळं खूप पटपट नाहीच झालं..पण अपेक्षेपेक्षा थोडं लवकरच....

पण या सगळ्यात ते एकमेकांचे चांगले मित्र बनू शकले..प्रेमाची पहिली पायरी मैत्री हीच असते ना....
आज ही ते भेटतात..चांगले मित्र म्हणून..
काही नात्यांना नावं नसतात त्यातलंच एक यांचं नातं...
दोघांनी परत लग्न नाही केलं..
इतरांना दिसत नसलं तरी मनातल्या मनात माणूस बराच काही सोसत असतो म्हणूनही असेल कदाचित पण त्यांनी परत एकत्र यावं असले इतरांचे सल्ले सुद्धा त्यांनी धुडकावून लावले...
2 perfect व्यक्ती एकत्र असाव्यात असं देवालाही वाटतं नसावं कदाचित..
ही गोष्ट इथेच संपली...
सगळयाच गोष्टींना Happy Ending नसतो  'एका लग्नाची दुसरी गोष्ट' सारखा.








No comments:

Post a Comment